Friday, June 27, 2014

ब्युटी स्पॉट!

   ल्ली सगळ्या गोष्टींवर आपण सतत उतारे किंवा ठोस उपाय शोधत असतो... म्हणजे अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते मानसिक दुखण्यांपर्यंत ( इथे मानसिक विकार अभिप्रेत नाहीत! ) ......... कोणाचीतरी प्रचंड आठवण येऊन अस्वस्थ वाटतं किंवा कुठलातरी अपेक्षाभंग मनाला खूप त्रास देत असतो... खुपत असतो... कधीतरी वाटतं अशा दु:खांवर मात करण्याऐवजी असु द्यावीत ती मनाच्या एका कोपर्‍यात. ती वेदना जिवंत ठेवावी. खरतर ती मुळापासून उखडून टाकणं कोणालाच शक्य नसतं... म्हणूनच ती नाहीच अस म्हणून तिचं अस्तित्व तरी नाकारू नये! या जखमा मनाला जागृत ठेवतात. अधिक संवेदनशील बनवतात... आणि पुढच्या वेळेस ठेच लागण्या आधीच सावधही करतात! त्यावर योग्य फुंकर घालणारी व्यक्ती जेव्हा मिळेल तेव्हा त्या वाहू द्याव्यातच पण एरवी देखील एकांतात त्यांना आपल्यावर सत्ता गाजवू द्यावी. म्हणजे त्या दु:खाला दडपून टाकण्यात आपली शक्ती व्यर्थ जात नाही.. ते दु:ख अनुभवून त्याचा निचरा झाल्यावर मनाला थोपटत म्हणावे ''आल इज वेल!!''
   येत असेल कोणाची आठवण तर ती येऊ द्यावी... विराहामुळे नात्यांची खोली आणि गोडी दोन्ही वाढते!! नात्यांना तपासून पाहता येते... त्याचा आकार आणि व्याप्ती कळते.
   शेवटी काय, दु:खाची, काळजीची काजळी असणारच आहे... फक्त तिला आपले आयुष्य व्यापू द्यावे की ब्युटी स्पॉट प्रमाणे तिचे अस्तित्व मान्य करत बाळगावे ही निवड आपलीच असणार आहे!

- रसिका

Monday, June 16, 2014


जब मैने भरोसा रखा दुनियापर, पुरानी मान्यताओंका नकाब हटाकर,
समझ आया की इंसानियत है सबकी खरी जात और है मझहब भी...
आदर, प्रेम, सम्मान तो सब मैं है समान... फर्क हैं तो सिर्फ रेहेन सेहेन, रिवाज और आदर्शों में ..
और फिर अंजाने लोगोंमेंभी मैने महफ़ूज़ मेहेसुस किया...

- रसिका

Tuesday, June 10, 2014


प्रत्येकाचे 'अभिमान' आणि प्रत्येकाची 'तत्व'!
प्रत्येकाच्या अपेक्षा अन् प्रत्येकाचे 'स्वातंत्र्य'!
आपापले स्वातंत्र्य जपायचा आज प्रत्येकाचा प्रयत्न,
मी म्हणेन तस समोरच्याने वागावे हा मात्र प्रत्येकाचाच आग्रह (बर्‍याचदा हट्ट!) !
मैत्री, प्रेम, जिव्हाळ्याच्या नात्यांना होतोय का या 'स्पेस' चा जाच?
की अजुन पुरेसे शिकायचोय आपण व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रॅक्टिकल?
की हा आहे पिढ्यांमधल्या वैचारीक अंतराचा मुद्दा?
माझ्यावर फक्त माझाच हक्क, मी माझा स्वतंत्र...
पण मग प्रेमाच्या ओलाव्यासाठी का आतून तुटतो इथे प्रत्येकजण?
अपेक्षाभंग इथे रोजचाच आणि प्रेमळ रुसव्या
फुगव्यांची जागा केव्हाच घेतल्ये धुसफूस आणि चिडचिडीनं.......
मनामनातल्या या शीतयुद्धाला आस आहे सामंजस्याची...
धुमसणार्‍या मनांना ओढ आहे शीतल, आश्वासक उबा-याची.....

- रसिका