Friday, January 25, 2013

मुंबई सारखी शहरे आता खूप मोठा गुंता होऊन बसल्येत..... सगळ्यांनाच फक्त पैसा कमावणे हेच जगण्याचे इतिकर्म वाटू लागलय... म्हणजे पैसा कमावण आवश्यक आहेच; पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण अश्या प्राथमिक गरजांबरोबर AC, Car, मोठी घरे, अधिक आरामदायी जीवनशैली, नवनवीन सौंदर्य प्रसाधने, Mall मधले Shopping, Hoteling, Electronic Gadgets, महागडे उच्च शिक्षण या सगळ्या नव्या खर्चांनी शहरातले जगणे व्यापून टाकलय.... अशा वाढीव गरजा भागवण्यासाठी अजुन पैसा... आणि तो मिळवण्यासाठी सगळ्यांनीच मुंबईकडे धाव घेण......
वहिवटा सोडून नवे मार्ग शोधण्याची हिंमत आमच्या पिढीत यायला हवी...........

- रसिका जोशी

Saturday, January 12, 2013

आधुनिक कपड्यांमधला मागास भारत!!!


२७ डिसेंबर २०१२

आपले कपडे, राहणीमान, घरे, कार्यालये, मनोरंजन सगळे काही चकचकीत दिखाऊपणाकडे झुकलेले असताना मन आणि संवेदना बोथट होत चाल्येत..... जाहिरातिंसारख्या माध्यमातून मुलीच्या आखया शरीराचाच लिलाव केल्यासारखा वाटतो!!!! काही प्रॉडक्ट्स च्या जाहिराती अगदी वर्तमान पत्रातील देखील माझया चिमुकल्या भाच्यांनी चुकुन पहिली तर त्याना काय वाटेल? किंवा सहावी सातवीतल्या आडनीड्या वयातील मुलानी पाहिल्या तर ते काय विचार करतील असा प्रश्न पडतो... आपण पैसा, दिखऊपणा, शारीरिक सौंदर्य, सेक्स, या सर्वाना अवास्तव महत्व देत नाहियोत का? जागतिक महासत्ता बनायची स्वप्ने पाहत असताना मनं किती संकुचित होतायत आपली??? मुलीला पूर्वी जसे केवळ शोभेची वस्तू म्हणून वापरले गेले तसेच आपण परत करत नाहियोत काय???

दिल्ली रेप केस बद्दल परवा ट्रेन मधल्या बायकांची चर्चा ऐकून मन व्यथित झाले... त्या नीच कृत्याला त्या बायका ''जानावरासारखे वागणे'' असे म्हणत होत्या!!

आपले राहणीमान जसे दिखाव्याकडे झुकत चालले आहे तसे आपल्या संवेदनाही मरत चालल्या आहेत.... गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी शारीरिक बळाची नव्हे मानसिक कणखरपाणाची गरज आहे!!! आणि माणसांच्या चुकीच्या कृत्याला पशुची उपमा देणे आधी थांबवले पाहिजे... थोडासा अभ्यास केले तर कळेल की निसर्गात एखाद्या मादीला जिंकण्यासाठी नर काय काय कष्ट घेतो... अगदी छोट्या फुलपाखरपासून ते मोरापर्यंत अनेक प्राणी पक्ष्यांमधे नर मादीला जिंकण्यासाठी कष्ट घेतो... कधी तिच्यासाठी सुंदर नृत्य करून, तर कधी तिच्यासाठी घरटे बांधून ... आणि अगदी फुलपाखरांमधे देखील जोडीदार निवडीचा अधिकार मादीला असतो.... एखाद्या मादीला एखादा नर मेटिंग साठी अयोग्य वाटला तर ती तसे संकेत देते आणि तो नर तिच्या निर्णयाचा आदर करून निघून जातो!!! असे असताना प्रगत आणि हुशार माणूस जातीच्या बलात्कारासारख्या विकृत कृत्याला आणि त्या व्यक्तीला जनावराची उपमा देणे अजिबात योग्य नाही!! हा समस्त पशु जातींचा अपमान होईल. माणसासारखा वाईट माणूसच!!


- रसिका जोशी

पुरुषी माज आणि आणि संवेदनाहीन बघे

२७ फेब्रुवारी २०१२ जुहू. (मुंबई)

आज जूहुला एका बाईला भर रस्त्यात एक माणूस (तिचा नवरा? ) चप्पलेनी मारत होता... आजूबाजूला सगळीकडे रीक्षेवले, स्टॉलवाले आणि इतर लोकांची वर्दळ होती... आणि त्यातले 98 % पुरूष होते !!! मी तिथे एका फोटोग्राफर मित्राची वाट बघत उभी होते... मी त्या माणसाला तिला दोनदा चपपलेनी तोंडावर मारताना पाहिलं... ती बिचारी केविलवाणी होऊन दोन्ही हात तोँडासमोर धरून नुसतीच त्याच्याकडे बघत होती... तिच्या बाजूला तीचीच मैत्रीण थंडपणे बसलेली!! आणि आसपासची लोक नुसता तमाशा पाहत होते... एका पॉइण्ट ला मला ते द्रुश्य सहनच झाल नाही.. मी त्या नालायक माणसाजवळ जाउन ओरडले.. " मारो मत पुलिस को बुलाउन्गि !!!! " मग तो जरा मागे हटला... मी अजुन त्याला चार शब्दा सुनावल्यावर त्याने तिला मारण थांबवल आणि तिथून गेला.... माझया मधे येण्यानी त्या बाईची त्याच्या तावडीतून सुटका झाल्ये असं वाटत असतानाच तो माणूस चक्क काठी घेऊन तिला मारायला आला!!! तरीदेखील आजबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रियेत काहीही फरक पडला नाही... मी पुन्हा नुसती तिच्यासमोर जाऊन उभी राहिल्यावर तो माणूस वाटेतच काठी टाकून निघून गेला !!!
मी जेव्हा ही घटना घरी सांगीतली तेव्हा आईची प्रतिक्रिया अशी होती...
'' त्यानी तुला काही केले असते तर?? आपण फार मधे पडू नये.." मी त्यांची काळजी समजू शकते पण समजा उद्या मलाच कोणी रस्त्यात इजा पोचवयचा प्रयत्न केला असता आणि आजूबाजूच्या शेकडो लोकांपैकी एकानेही मदत केली नसती तर???? :( :( त्या बाईला मारत असतानचे द्रुश्य पाहून मी थरथरत होते... पण अचानक कुठुनतरी बळ आल आणि मी मधे पडले... आपण निदान आपल्या डोळ्यांसमोर होणारा अन्याय तरी थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे अस मला वाटत... आपल्या छोट्याशा कृतीनेदेखील एखाद्याला खूप फायदा होऊ शकतो!! फक्त आपल्या संवेदना जागृत ठेवायला हव्यात... दुसर्‍याचा बचाव करण्यासाठी थोडस धैर्य दाखवायला काय हरकत आहे? भलेही त्या माणसाने मी गेल्यावर तिला पुन्हा मारल असेल.. पण चार चौघात मारताना मी त्याला आडवल्याचा परिणाम एका तरी ''बघ्यावर'' झाला तर पुढच्यावेळी तो देखील कदाचित कोणालतरी मदत करेल... तुम्हाला काय वाटत?


- रसिका जोशी

Friday, June 24, 2011

पाऊस मुंबईतला आणि मुंबईकरांच्या मनातला !!!

पाऊस म्हणजे गाड्या 'लेट'...
पाऊस म्हणजे कपड्यांना चिखलाची भेट!

पाऊस म्हणजे सैरभैर पक्षी आणि घोंघावणारा वारा...
पाऊस म्हणजे 'नरीमन पॉइंट' आणि उधाणलेल्या लाटा!

पाऊस म्हणजे विजांचा लखलखाट...
पाऊस म्हणजे ओल्या मातीचा घमघमाट!

पाऊस म्हणजे कोसळणार्‍या सरी वेड्या...
पाऊस म्हणजे डबक्यात सोडलेल्या कागदी होड्या!

पाऊस म्हणजे कोळ्याच्या जाळ्यावर थेंबांची नक्षी...
पाऊस म्हणजे खिडकीच्या आडोश्याला आलेले पक्षी!

पाऊस म्हणजे कोवळी नाजुक सकाळ...
पाऊस म्हणजे हवीहवीशी रोमॅंटीक संध्याकाळ!

पाऊस म्हणजे 'हिरवळ'...
पाऊस म्हणजे 'जल-निर्मळ'!

पाऊस डोळ्यात साठवू...
पाऊस मनात रूजवू...
पाऊस ऐकू...
पाऊस अनुभवू...

पाऊस म्हणजे मनाच्या कोपर्‍यात रूतून बसलेली आठवण...
पाऊस म्हणजे हळव्या नाजूक क्षणांची साठवण!

पाऊस म्हणजे चैतन्यात न्हालेल्या दिशा दहा...
पाऊस म्हणजे चिंब संध्याकाळ आणि हातात वाफाळता चहा!

- रसिका जोशी

Tuesday, April 5, 2011

साधं, सरळ आणि सोप्पं जगायचय यार !!!

Want to live a simple life........

I want to live a simple carefree life!! But It doesn't mean I am less Ambitious... The kind of rat race going around is sucking all the simple, Beautiful things from our life... We don't have time to have a cup of tea with friend, we cant chat with our parents as we are tired after the busy day!! Excellence in work, in studies is needed but not at the cost of peace in life! Isn't it? So stop for a while, take a breath, find out what exactly you want......


साधं, सरळ आणि सोप्पं जगायचय यार!

आजकाल साधं, सरळ, सोप्पं असा काही दिसतच नाही!
जो तो विचारतो किती 'Marks', कोणती 'Grade', किती 'Salary' मिळवताय राव?

कधीतरी करा की आमच्या 'B' Grade चं कौतुक!
कधीतरी म्हणा वा! शाब्बास! आमच्या ७५ टक्क्यांना!

सगळ्यांनीच पहिलं यायला हवं का?
सगळ्यांनीच 'Reality Show' चा 'Hero' असायला हवं का?

मित्रांच्या जमलेल्या मैफिलीत कुठे लागतो 'स्वर्गीय' गळा?
'Dj Night' किंवा लग्नाचा वरातीत कुठे लागते 'अशक्य' नृत्यकौशल्य?

सरळ, साध्या, सोप्प्या, अशा खुप गोष्टी आनंद देतात...
जीवघेण्या स्पर्धेतून थोडं बाजूला होऊया...
आपण आपल्याला शोधुया...
मग लक्षात येईल रोजच्या जगण्यात किती आनंद दडलाय!

- रसिका जोशी